पुणे, दि. 3 (प्रभात वृत्तसेवा) -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांसाठी लॉटरी काढण्यात आलेली आहे. आता सोमवारी (दि.4) दुपारी
4 वाजल्यानंतर पालकांना लॉटरीचे “एसएमएस’ प्राप्त होणार असून प्रवेशासाठी कोणती शाळा मिळाली याची माहिती मिळणार आहे.
पालकांना सूचना
“एसएमएस’ची वाट न पाहता पालकांनी आरटीई पोर्टलवरील “अर्जाची स्थिती’ या टॅबवर अर्ज क्रमांक टाकून अपडेट घ्यावे.
प्रवेश लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळवावी लागणार.
निवड झालेल्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष तपासणी करुन घ्यावी. मगच प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
प्रवेश घेतल्यानंतर शाळा बदलून मिळणार नाही.
…तर प्रवेश रद्द
निवासी पुरावा पत्ता व गुगल लोकेशन यात तफावत आढळल्यास पडताळणी समिती प्रवेश रद्द करण्याची कारवाई करू शकणार आहे. निवासी पुरावा म्हणून बॅंक पासबुक हे राष्ट्रीयकृत बॅंकचेच ग्राह्य धरण्यात येणार आहे.
राज्यातील परिस्थिती
9 हजार 88:
शाळांची नोंदणी
1 लाख 1 हजार 977 :
प्रवेशाच्या जागा उपलब्ध
2 लाख 82 हजार 778 : पालकांचे अर्ज दाखल
“आरटीई’ प्रवेशासाठी
पुणे जिल्ह्याची स्थिती
957 शाळा
15 हजार 131 प्रवेश जागा
62 हजार 956 पालकांचे अर्ज