श्रीनगर: पुलवामा हल्ल्याची आज वर्षपूर्ती असताना पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा पूंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने केलेल्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जशास तसे उत्तर दिले. पण पाकच्या गोळीबारात एक नागरिक ठार, तर चार जण जखमी झाले आहेत.
पुलवामामध्ये गेल्या वषी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांची बस उडवली होती. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या जवानांना भारतात आदरांजली वाहण्यात येत असताना पाकने मात्र पूंछमध्ये गोळीबार केला.
तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यब पाकिस्तानच्या दौ-यावर आहेत. पाकिस्तानसाठी काश्मीर जेवढे महत्त्वाचे आहे तेवढचं तुर्कीसाठीही आहे, असे वादग्रस्त वक्तव्य तय्यब एर्दोगान यांनी केले. या पार्श्वभूमीवर पाक सैन्याने हा गोळीबार केल्याने तणाव वाढू शकतो.