मुंबई – द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरूनही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली होती.मोदीजी, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात, असा रोखठोक प्रश्न राऊत यांनी विचारला होता. यावरून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे.
पडळकर यांनी फेसबूकवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिले आहे की,’जनाब संजय राऊत ऊर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतरसुद्धा वीज कापली जातेय त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतोय. यावर कधीतरी एखादा लेख लिहा. सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरुन दाखवा. म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल.’ असे म्हणत पडळकर यांनी राऊतांवर ओपन चॅलेंजच दिले आहे.
नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर पहा व्हिडिओ