मुंबई – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. खडसे यांनी आपल्या मनातील खदखद वेळोवेळी बोलून दाखवल्यानंतरही पक्षातर्फे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अशातच आज खडसे यांनी आज पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघड निशाणा साधला आहे.
“आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,” असा प्रश्न उपस्थित करत खडसे यांनी लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा केली.
“सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले, मग तिकीट का दिले नाही? मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचं दुःख नाही. उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो. पक्षाच्या विरोधात कधीही बोलणार नाही. आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का? नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. स्वस्थ बसणार नेता नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे,” अशा शब्दांमध्ये खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
कंगनाने मुख्यमंत्र्यांना अरेतुरे केल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…
खडसे यांच्या जीवनावरील सुनील नेवे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात खडसे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ लिहिणार असल्याची घोषणा
यावेळी बोलताना त्यांनी, “लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहिणार आहे. त्यातून अनेक गोष्टी उघड करणार आहे. दोन चार राजे लाचार झाल्याने इंग्रज बळकट झाले होते. हा इतिहासाशी मिळता जुळता कार्यक्रम आहे. मी पुस्तक लिहिण्याएवढा मोठा नाही, मात्र त्यांच्या प्रेमाने लिहिलं आहे. तुमच्या मनात असलेले हे पुस्तक नाही ते अजून यायचं आहे. दाऊदच्या बायकोवरुन सोबत आरोप केले. मनीष भंगाळेला सन्मानाची वागणूक दिली जाते. आता सगळे पुरावे मला मिळाले आहेत. नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहिणार आहे. त्यात सगळे मी लिहिणार आहे,” असं देखील सांगितलं.