मुंबई – राज्यात मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण (Maratha-Obc) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण (Obc Reservation) देऊ नयेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज जालन्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभा (OBC Sabha) आयोजित करण्यात आली होती.यावेळी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत विरोध दर्शवला. यानंतर आता भुजबळांच्या वक्तव्यावरून राजकीय प्रतिक्रिया यायला सुरवात झाली आहे. छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार सभा (Obc Elgar sabha) घेत जरांगे पाटील (Jarange Patil) यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यानंतर स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी भुजबळांच्या भूमिकेवर केला आहे.सोशल मीडियावरून ट्विट करत संभाजीराजेंनी आपली भूमिका मंडळी आहे. (Chhatrpati sambhajiraje vs chhagan bhujbal)
आपल्या ट्विटमध्ये संभाजीराजे म्हणतात,”छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.”
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 17, 2023
“सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी” अशी देखील संभाजीराजे यांनी मागणी केली आहे.
काय म्हणाले होते भुजबळ नेमकं ?
“हे आरक्षण गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. आज 75 वर्ष झाली. दलित समाजाला संविधानाने आरक्षण दिलं. एसपी झाले, कलेक्टर झाले, आयएएस झाले… पण आजही या झोपडपट्ट्यातून आमचे गोरगरीब दलित बांधव राहतो. गरीबी दूर झाली नाही. ओबीसींचीही गरीबी दूर झाली नाही. हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. जे वर्षानुवर्ष पिचलेले आहेत. दबलेले आहेत. त्यांना वर आणण्यासाठी दिलेलं हे आरक्षण आहे. हे आरक्षण म्हणजे काय आहे हे तर समजून घ्या”, असं छगन भुजबळ म्हणाले.