मुंबई – राज्यात कोणताही समाज एकमेकांसमोर उभं राहणे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही. तर मी ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की, कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात आम्ही संकल्पबद्ध आहोत, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय स्पष्ट घोषणा केली आहे. पण त्याचवेळी कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होईल अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार घेणार नाही. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील अश्वस्त केलेले आहे. म्हणून अशा प्रकारची शंका सर्वांनी मनातून काढून टाकावी आणि महाराष्ट्रात शांतता कशी नांदेल असा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.