नवी दिल्ली – भारतातील क्रीडा संघटनांमध्ये महिला प्रतिनिधींनाही जास्त संधी दिली जावी. येत्या काळात देशातील सर्व संलग्न क्रीडा संघटनांनी या धोरणाचा गांभीर्याने विचार करावा यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) व्यक्त केले आहे.
करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने संलग्न राज्य संघटनांच्या सदस्यांशी प्रत्यक्ष बैठक घेत संवाद साधता येणार नसल्याचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जाणार आहे. प्रत्येक राज्य क्रीडा संघटनांमध्ये महिला सदस्यांना किमान 30 टक्के कोटा असावा, असेही संघटनेने म्हटले आहे.