पुणे – दर्शनातून नागरिकांना सकारात्माक ऊर्जा मिळत असते. त्यामुळे महाराष्ट्रातील देवींची साडेतीन शक्तीपीठे दर्शनासाठी भाविकांना खुली करावीत, अशी मागणी ऍड. अभिजित जयस्वाल यांनी केली आहे. त्यामुळे करोना काळातही नागरिकांना मानसिकदृष्ट्या दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. माहुरची रेणूका, तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची आंबिका, वनीच्या सप्तश्रृंगी मातेचा शक्तीपीठामध्ये समावेश आहे.
धार्मिक स्थळावरील अर्थशास्त्रीय साखळी पूर्णत: कोलमडली आहे. पुजेचे साहित्य, खेळणी, बांगडी विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक यांचे हाल होत आहेत. त्यांना जगणे मुश्कील बनले आहे. त्यात भाविकही दर्शनासाठी आसुरले आहेत. “ब्रेक द चेन’ उपक्रमांतर्गत राज्य सरकारने व्यावसायिक, हॉटेल विक्रेत्यांना दिलासा देण्यात आलेला आहे. दुकाने, हॉटेल उघडण्यास वेळ वाढवून दिला आहे. याच धर्तीवर श्रध्दास्थान असलेल्या शक्तीपीठे खुली करू करावीत, असेही ऍड. जयस्वाल यांनी म्हटले आहे.