बारामती, (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या दहा ते बारा दिवसांवर येऊन ठेपली आता बारामती मतदारसंघात राजकारण तापू लागले आहे. आता मेळाव्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष याकडे लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीची धगधग आजही कायम आहे. नमो महारोजगार मेळावा व विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री हे एकाच व्यासपीठावर येत आहे. पुरंदरमध्ये सुदाम इंगळे यांच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकत्र येणार आहेत.
पुरंदरचा कार्यक्रम दि. १ मार्च रोजी आहे. त्यानंतर दुसऱ्यादिवशी शिंदे- पवार, फडणवीस सरकार कार्यक्रमासाठी येत आहे. यात मेळाव्यात हे तिघे काय बोलणार, तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणार काय, याची उत्सुकता ताणली आहे.
नमो मेळाव्यानिमित्त तीन नेते येणार आहेत. यावर सुळे यांनी अतिथी देवो भव, असे स्वागत करीत खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या कार्यक्रमात आरोप- प्रत्यारोप, तसेच केंद्र सरकारच्या कामांचे गुणगाण होण्याची चर्चा उमटत आहे.