Arvind Kejriwal । अबकारी धोरण प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी रात्री अटक केली.
डरा हुआ तानाशाह, एक मरा हुआ लोकतंत्र बनाना चाहता है।
मीडिया समेत सभी संस्थाओं पर कब्ज़ा, पार्टियों को तोड़ना, कंपनियों से हफ्ता वसूली, मुख्य विपक्षी दल का अकाउंट फ्रीज़ करना भी ‘असुरी शक्ति’ के लिए कम था, तो अब चुने हुए मुख्यमंत्रियों की गिरफ्तारी भी आम बात हो गई है।
INDIA इसका…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 21, 2024
दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या (आप) राष्ट्रीय समन्वयकाला एजन्सीच्या कोणत्याही जबरदस्ती कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर काही तासांतच त्यांची अटक झाली. मुख्यमंत्री पदावर असताना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.
या अटकेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका केली जात आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांनीही या घटनेवरून X वरून पोस्ट करत मोदी सरकार निशाणा साधला आहे.
Arvind Kejriwal । राहुल गांधी यांची पोस्ट
‘एक घाबरलेला हुकूमशहा मृत लोकशाही निर्माण करू इच्छितो…माध्यमांसह सर्व संस्था ताब्यात घेणे, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून पैसे उकळणे, प्रमुख विरोधी पक्षाचे खाते गोठवणे हेही राक्षसी शक्तीसाठी कमी होते, आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणेही सामान्य झाले आहे. इंडिया आघाडी याला चोख प्रत्युत्तर देईल.’असे माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी X वर पोस्ट केले.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटले की, ‘लोकसभा निवडणुकीमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करणे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे.’
हे वाचलं का ?
सुप्रिया सुळेंची मागणी,’रोहित पवार अन् युगेंद्र पवारांच्या ‘जीवाला धोका’ तातडीने पोलीस सुरक्षा द्या’