Kumar Vishwas on Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. दरम्यान, कवी कुमार विश्वास यांनी देखील या अटकेवर प्रतिक्रिया दिलीय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी फक्त २ ओळीत आपलं मत मांडले आहे.
दोह्याच्या माध्यमातून केजरीवाल यांच्यावर निशाणा Kumar Vishwas on Kejriwal ।
कवी कुमार विश्वास यांनी रामचरित मानसमधील एका दोह्याच्या माध्यमातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना “तुम्ही जे काही कराल तेच परिणाम तुम्हाला मिळतात”अशा आशयाची पोस्ट त्यांनी केलीय. प्रत्यक्षात गुरुवारी रात्री ईडीने केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली.
कर्म प्रधान विश्व रचि राखा ।
जो जस करहि सो तस फल चाखा ॥🙏 pic.twitter.com/XLp2MertD3— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) March 21, 2024
दिल्ली उच्च न्यायालयाने आज केजरीवाल यांना ईडीच्या कोणत्याही कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिला आहे. काही तासांनंतर केंद्रीय तपास यंत्रणेने त्याला अटक केली. त्यांना शुक्रवारी नी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील, असे आप नेते आतिशी यांनी सांगितले.
We have moved the Supreme Court for quashing the arrest of Delhi CM @ArvindKejriwal, by ED. We have asked for an urgent hearing by the Supreme Court tonight itself.
— Atishi (@AtishiAAP) March 21, 2024
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री राहतील Kumar Vishwas on Kejriwal ।
दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी सांगितले की, केजरीवाल मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील आणि त्यांना अटक केल्यानंतर गरज पडल्यास ते तुरुंगातून सरकार चालवतील. आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी केजरीवालांना किती घाबरले आहेत हे या संपूर्ण प्रकरणावरून दिसून येते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना तुरुंगात पाठवण्याचा कट त्यांनी रचला होता.” दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना अटक करण्याचा मोठा कट रचण्यात आल्याचा आरोप आप खासदार राघव चढ्ढा यांनी केला.