भारतात ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन प्रकाराचा धोका हळूहळू वाढत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशात गेल्या 10 दिवसांत विदेशातून सुमारे 60 प्रवासी येथे दाखल झाले आहेत. यापैकी नऊ जण आफ्रिकेतून आले आहेत. 60 पैकी 30 प्रवासी विशाखापट्टणममध्ये थांबले आहेत. तर उर्वरित 30 जण राज्यातील विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.
आंध्र प्रदेश सरकार या 30 जणांचा शोध घेत आहे. यापैकी काहींनी फोन उचलणेही बंद केले आहे. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना हे प्रवाशी बेपत्ता होण्याची भीती आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता, सरकारला या लोकांची RT-PCR चाचणी करायची आहे. मात्र हे प्रवाशी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत.
दरम्यान, जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंटने डोके वर काढले असून या ओमायक्रॉनचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. याशिवाय हा व्हेरियंट जास्त धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खबरदारीम्हणून भारतातील अनेक राज्यांनी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले आहेत.