नवी दिल्ली – ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 1000 हून अधिक लोक दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. 7 पेक्षा जास्त पोकलेन मशीन, 2 अपघात मदत गाड्या, 3-4 रेल्वे आणि रोड क्रेन परिस्थिती पुरवत करण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहचले अपघातस्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा रेल्वेमंत्र्यांनी आढावा घेतला.रेल्वे दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह एम्स, भुवनेश्वर येथे आणण्यात आले. भुवनेश्वरचे डीसीपी प्रतीक सिंह म्हणाले की, एकूण मृतांपैकी 160 मृतदेह आणले जात आहेत. एम्समध्ये सर्वात मोठे केंद्र आहे जेथे सुमारे 100 मृतदेह ठेवता येतील आणि इतर मृतदेह इतर रुग्णालयांमध्ये ठेवण्यात येतील.
कोरोमंडल एक्स्प्रेसचे प्रवासी चेन्नईला पोहोचले
ओडिशात रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसमधील प्रवासी आज तामिळनाडूमधील चेन्नई रेल्वे स्थानकावर विशेष ट्रेनने पोहोचले. प्रवाशांच्या मदतीसाठी पोलिस, टीडीआरएफ आणि कमांडो तैनात आहेत. स्थानकाबाहेर रुग्णवाहिका, टॅक्सी आणि बसेसही उपलब्ध आहेत.
तिसरा सर्वात मोठा अपघात
शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २८८ वर पोहोचली आहे. जखमींची संख्याही 1100 हून अधिक झाली आहे. यातील 100 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.या रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोषींना सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे. ओडिशातील ही दुर्घटना देशातील तिसरी सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे सांगितले जात आहे.