म्हैसूर – कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे “भारत जोडो’ यात्रेच्या दरम्यान मुसळधार पावसात उपस्थितांना संबोधित केले. त्यांच्या या सभेमुळे तेथे जोरदार वातावरण निर्मिती झाली आणि उपस्थितांनी राहुल यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या.
देशाला एकत्र करण्यासाठी आम्हाला काहीही रोखू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले. राहुल गांधी हे म्हैसूर येथील सभेच्या ठिकाणी आले असता तेथे अचानक पाऊस सुरू झाला. पण राहुल गांधी यांनी व्यासपीठ न सोडता आपले भाषण तसेच सुरू ठेवल्याने उपस्थितांनीही त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.
“Hum Bharat Jodenge”#BharatJodoYatra pic.twitter.com/jVLebxCwY7
— Bharat Jodo (@bharatjodo) October 2, 2022
राहुल गांधी म्हणाले की, हा प्रवास कन्याकुमारी ते काश्मीर असा सुरू राहील तो थांबणार नाही. पाऊस पडत आहे, पण उष्णता, वादळ, थंडी ही यात्रा थांबवू शकत नाही. हा नदीसारखा प्रवास कायम राहील. या नदीत तुम्हाला द्वेष किंवा हिंसाचाराचे कोणतेही चिन्ह सापडणार नाही.
तेथे फक्त प्रेम आणि बंधुता असेल कारण हा भारताचा इतिहास आणि डीएनए आहे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. तत्पूर्वी, दिवसभरात, राहुल गांधी यांनी बदनावलू ते म्हैसूरपर्यंत 10 किलोमीटरहून अधिक अंतर कापले. यात्रा मार्गावर स्थानिक नागरिकांनी त्यांचे वाजतगाजत स्वागत केले.