अमरावती: भाजप सरकारने केवळ मार्केटिंगवर भर दिला, मात्र कामांची योग्य अंमलबजावणी केली नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी अमरावती येथे आयोजित परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
रोहित पवार म्हणाले, मागील पाच वर्षात भाजप सरकारने मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार या योजनांवर काम केलं. मात्र या सर्व योजना थेट लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत. जलयुक्त शिवारावर 6-7 हजार कोटींवर खर्च मागील सरकारने केला. मात्र या योजनांमध्ये केलेलं कामाची आजची स्थिती वाईट आहे. त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. या योजनांमागे विचार चांगला होता, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य झाली नाही. भाजपने काम कमी केलं आणि कामांंचं मार्केटिंगच जास्त केलं, अशी कणखर टीका रोहित पवार यांनी केली.