सोरतापवाडी (उरुळी कांचन, पुणे) – सर्वत्र करोनाने थैमान घातलेले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा केलेला आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, म्हणून निखिल भैय्या युथ फाऊंडेशन तर्फे गणेश मूर्ती संकलन केंद्र ऊरूळीकांचन मध्ये उभारले जाणार आहे, अशी माहिती असे फाउंडेशचे अध्यक्ष निखिल कांचन यांनी दिली.
तोंडाला मास्क घालून जरुरी असेल तरच घराबाहेर पडावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे. गरज नसेल तर गावातील व परिसरातील साठ वर्षापुढील वयोवृध्दांनी बाहेर पडू नये. तरच आपण करोनाला हरवू म्हणून आम्ही गावातील नागरिकांसाठी गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होऊ नये म्हणून हा उपक्रम राबवत आहोत. कोणाला आपली गणेश मूर्ती विसर्जनासाठी द्यावयाची असेल त्यांनी आम्हाला संपर्क करावा. उरुळी कांचन पोलीस चौकी जवळ, तळवाडी चौक व आश्रम रोड या तीन ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन करून भक्तीभावाने मूर्ती विसर्जित करू असे कांचन यांनी यावेळी सांगितले. यावेळी सचिन कांचन, शारिक सय्यद, अमोल मेहेर, प्रमोद कांचन, आदेश गिरमे, सुहास चव्हाण उपस्थित होते.