राजगुरूनगर (प्रतिनिधी) – राजगुरूनगर येथील मोफत शिवभोजन थाळीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. पण सध्या राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन आहे. त्यामुळे गरीब गरजूंची संख्या व मर्यादित शिवभजोजन थाळी अपुरी पडत असल्याने शासनाने शिवभोजन थाळीची मर्यादा वाढवावी तसेच दिवसातून दोन वेळा ती मिळावी, अशी मागणी गरीब व गरजू नागरिक करीत आहेत.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1190932244579812/
शासनाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या येथील शिवभोजन थाळी केंद्रात केवळ १०० थाळी मिळत आहेत. त्याउलट येथे भुकेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने हि शिवभोजन थाळी कमी पडत आहे, त्यातच ती एकवेळ मोफत दिली जात असल्याने येथील गर्दी वाढत आहे. त्यामुळे सरकारने येथील केंद्रावर शिवभोजन थाळीच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी राजगुरूनगर येथील गरीब व गरजू कामगार महिलांनी केली आहे.