स्टिव्ह स्मिथकडून मीडिया ट्रायल
मेलबर्न – भारतीय संघाला भारतातच पराभूत करणे अत्यंत कठीण आहे. मात्र, आता भारताविरुद्ध भारतात जी मालिका होईल त्यात त्यांचा त्यांच्याच देशात पराभव करणे हेच माझे एकमेव लक्ष्य आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज स्टिव्ह स्मिथ याने व्यक्त केले आहे. अर्थात ही ऑस्ट्रेलियाची जुनी खोड आहे. मालिकेपूर्वी माध्यमांमध्ये अशा प्रकारची मते व्यक्त करायची व भारतावर दडपण निर्माण करायचे. मात्र, देल्या दोन दशकांत अशी खेळी करत ज्या ज्या वेळी ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला त्या प्रत्येक वेळी भारतीय संघाने त्यांचेच दात त्यांच्याच घशात घातले आहेत.
मी ऑस्ट्रेलियाकडून खेळतो त्यामुळे आमच्यासाठी इंग्लंडविरुद्धची अशेस स्पर्धा महत्वाची असते. गेल्या दोन दशकांपासून मात्र भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका जास्त लक्षवेधी ठरल्या आहेत. त्यामुऴे त्याला भारत व पाकिस्तान यांच्यातील लढतींसारखेच स्वरुप आले आहे. आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु केली असून त्यात भारतीय संघच जास्त गुणांसह अव्वल
क्रमांकावर आहे. मात्र, येत्या काळात होत असलेल्या काही मालिकांमध्ये विजय मिळवुन आम्ही पहिला क्रमांक निश्चितच प्राप्त करु असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
जडेजाची गोलंदाजी निर्णायक..
भारतातील खेळपट्टय़ांवरचा इतिहास पाहिला तर येथे फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. त्यातच डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा अत्यंत अचूक गोलंदाजी करतो. त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजाला ओपनचेस्ट फलंदाजी करता येत नाही. म्हणुनच या दोन संघात होत असलेल्या मालिकेत जडेजाच धोकादायक ठरेल, असा सल्लाही त्याने आपल्या सहकारी खेळाडूंना दिला आहे.