जळोची, दि. ६ (वार्ताहर)- तुम्ही कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे आणि पुन्हा हा महाराष्ट्र ऐक्याने चालवू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
बारामती येथे शिवसेनेच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी पवार बोलत होते. पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले.
दोन पक्ष फोडून सत्तेवर आलो, असे म्हणाले होते. त्यांचा समाचार घेताना पवार म्हणाले की, आता यांचे काय कर्तृत्व आहे. त्यांनी काय काम केले आहे. पक्ष फोडण्याचं काम केल आहे. कुणाचे घर फोडण्याचे काम केल आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र फोडण्याचे काम केले आहे. त्यांना हे माहित नाही, त्यांनी पक्ष फोडला असेल, काही लोक गेले असतील, पण त्यांना हे माहीत नाही की, काही लोक गेले असतील, फोडले असतील, परंतु हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आहेत, ते मात्र जागेवरच आहेत. ते त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा ऐक्याने महाराष्ट्र चालवू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत.
कुणाही समोर झुकणार नाही
पवार म्हणाले की, आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या प्रमुखांनी दहशत निर्माण केली आहे. निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, पण आता आता कोणी फोन करतो. कोणी धमक्या देतो सध्या हे महाराष्ट्रात सुरू आहे, पण त्यांना हे माहीत नाही, तुम्ही कितीही दम दिला व धमक्या दिल्या, तरीही त्याला भीक न घालणारी ही अवलाद आहे. ती अवलाद कुणाही समोर झुकणार नाही.