नेवासा – नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे कपाशी, तूर, बाजरी, मका व फळबाग पिकांचे सन २०२२ मध्ये मोठे नुकसान झालेले आहे. महसूल विभागाने केवळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई दिलेली नसल्यामुळे भेंडे येथे सोमवार (दि.१) रोजी सकाळी १० वाजता नेवासा – शेवगांव राज्यामार्गावरील चौकात जीवन ज्योत फाऊंडेशनने तहसिल कार्यालयाचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला आहे.
नगर: भेंडे येथे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी तहसील कार्यालयाची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा pic.twitter.com/6W5kcuTkCW
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 1, 2024
नुकसनग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करण्यात आलेले होते. वेळेवर पाऊस पडत नसल्यामुळे आधीच बळीराजा खचून गेलेला आहे व बळीराजाची अर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे शेतकरी अर्धमेला अवस्थेत असतांनाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकरी वर्गावर शासनाने कृपा दाखवत अतिवृष्टीने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने जाहीर केलेले होते.
सन २०२२ यावर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकांची भरपाई मंजूर होऊन यादीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावेही आलेली आहेत. मात्र, ही नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई नेमकी मिळणार तरी कधी? असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांकडून यावेळी करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावी, यासाठी तहसील कार्यालयात जीवन ज्योत फाऊंडेशनच्यावतीने यापुर्वी अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनाची तहसील कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे सोमवारी सकाळी १० वाजता चक्क तहसील कार्यालयाचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की, आता शेतकरी विरुद्ध महसूल विभाग असे युद्ध सुरू झालेआहे. जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर जमा झाली नाही तर तहसील कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली. यावेळी जीवन ज्योतचे अध्यक्ष कमलेश नवले पाटील, छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर, सत्यमेव जयते प्रतिष्ठानचे जैद शेख, अक्षय बोधक, आप्पासाहेब आरगडे, ओम आरगडे, सुधीर आरगडे, गणेश चौघुले, अमोल जोगदंड, महेश नवले, तोफीक शेख, विजय खरात, प्रदिप आरगडे, रोहित रुईकर, बडू आरगडे, अॅड.पाडूरंग औताडे, गौरव नवघरे, शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले, संजय ठुबे, प्रदिप जाधव, निलेश आरगडे, बाबासाहेब चामुटे, सादिक शेख, सुफियान सय्यद, विराज वाल्हेकर, प्रमोद निकम, महेश बोरुडे, अफरोज शेख, चंद्रकांत आरगडे, नितीन आरगडे, दिपक नवले, राम गरड, सुनिल गव्हाणे, अक्षय आरगडे, अभिजीत बोधक, संभाजी आरगडे, पांडूरंग आरगडे, लखन गरड, सागर कदम, सिद्धांत आरगडे, बन्सी भिगारे, निलेश कडू यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.