पारनेर महाविद्यालयात अर्थव्यवस्थेवरील चर्चासत्र
पारनेर (प्रतिनिधी) – भारतीय अर्थव्यवस्थेत खूपच वैविध्य दिसून येत आहे. भारतामध्ये शेती करणाऱ्या दोन तृतियांश लोकांचा उदरनिर्वाह शेती व शेती संबंधित उद्योगांवर चालतो. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे सरकारचे धोरण असावे, असे मत माजी आ. नंदकुमार झावरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्टस कॉलेजमधील कॉमर्स व अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. ते म्हणाले, शेतीचे खरे बजेट समजले, तरच समाजातील दुर्लक्षित घटकांचा विकास होईल व भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील खरी आव्हाने दूर होतील, असे मत मांडले. बीजभाषक म्हणून सीए डॉ. शिवाजीराव झावरे उपस्थित होते. ते म्हणाले, चांगले काम करणाऱ्याला व ज्याच्याकडे कौशल्य आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रावीण्य मिळावले पाहिजे व स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मासात करावे.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, कॉमर्स विभागप्रमुख प्रा. युवराज वाघेरे, डॉ. दीपक सोनटक्के, ऍड. पांडुरंग गायकवाड, रामा एरंडे, प्रा. रणजित शिंदे, प्रा. शिवाजी पठारे, प्रा. डॉ. अशोक घोरपडे, प्रा. काकासाहेब टिळे, प्रा. तुषार गालबोटे उपस्थित होते. चर्चासत्रात विविध महाविद्यालयांतील 75 प्राध्यापक सहभागी झाले होते.प्रास्ताविक प्रा. युवराज वाघेरे यांनी केले, तर आभार डॉ. दीपक सोनटक्के यांनी मानले.