सुरत- महाराष्ट्राचा अव्वल धावपटू अविनाश साबळेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत मिळविलेल्या यशानंतर तो 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उतरणार आहे. या स्पर्धेला मंगळवारपासून (दि. 27) प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा 29 सप्टेंबरला होणार असून तब्बल आठ वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेत 6500 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 33 राज्यांचे संघ सहभागी होत असून गुजरातला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.
यजमान गुजरातसह महाराष्ट्र, हरियाणा, दिल्लीचे खेळाडूंचे पथक मोठे आहे. महाराष्ट्राचे 546 खेळाडू या स्पर्धेच्या 31 क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानूसह जेरेमी, लवलिना बोरगोहाई, लक्ष्य सेन, जोश्ना चिनप्पा, माना पटेल, मनू भाकर, गायत्री गोपीचंद, तसनीम मीर यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा अविनाश, चिराग शेट्टही यंदा पदकाचे दावेदार आहेत.
महाराष्ट्रातील सुपरस्टार धावपटू अविनाश साबळेसह बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, अन्नू, दुती चंद, हिमा दास, अंकिता रैना, झील देसाई, एन. सिक्की, तसनीम, लक्ष्य सेन, गायत्री, साई प्रणीत, मणिका बत्रा, जी साथियान, अचंत शरत कमल, श्रीजा अकुला, हरमीत देसाई, मानव ठक्कर, नमिता, सलीमा, मनू भाकर, गोस्वामी, मीराबाई, जेरेमी, अचिंता शिउली, लवलीना, शिवा थापा, डेव्हिड बेकहम, रोनाल्डो, माना पटेल, साजन प्रकाश, अनाहत सिंह, जोशना चिनप्पा, भवानी देवी यांच्या कामगिरीवर लक्ष राहणार आहे. दरम्यान, ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.