सुरत : सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सुपर लीगमध्ये राजस्थानने महाराष्ट्राचा ६ गडी राखून पराभव केला आहे. सुपर लीगमध्ये महाराष्ट्राचा हा दुसरा पराभव ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या संघाला २० षटकांत ९ बाद ९९ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. महाराष्ट्राकडून फलंदाजीत निखील नाईकने २३ तर अझीम काझीने १८ धावा केल्या. राजस्थानकडून गोलंदाजीत राहूल चहर आणि चंद्रपालसिंग यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
विजयासाठीचे १०० धावांचे लक्ष्य राजस्थान संघाने १६.२ षटकांत ४ बाद १०१ धावा करत पूर्ण केले. राजस्थानकडून फलंदाजीत लोमरोरने नाबाद ३५ आणि लांबाने ३३ धावांची खेळी करत संघास विजय मिळवून दिला.