मुंबई – विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी अखेर 33 वर्षांपूर्वी अकादमी उभारण्यासाठी वांद्रे येथे मिळालेली जमीन म्हाडाला परत केली. आपण त्या जागी अकादमी बांधू शकत नसल्यानेच अखेर हा निर्णय घेतल्याचे गावसकर यांनी म्हाडाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
म्हाडाने 1980 साली सुनील गावसकर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला ही जमीन दिली होती. 21 हजार 348 चौरस मीटर भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव म्हाडाने गावसकर यांच्याकडे पाठवला होता. जमीन परत करत असल्याचे पत्र गावसकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पाठवले असून ते मिळाल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे.
म्हाडाने डिसेंबर 2019 मध्ये गावसकर यांच्या ट्रस्टसोबतचा करार रद्द करण्याची विनंती करून सरकारला संपर्क केला होता. त्यानंतर गावसकर यांनी सचिन तेंडुलकरला या उपक्रमात सहभागी करून घेत मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती.
‘या’ कारणामुळे अकादमी उभारण्यासाठी मिळालेली जमीन गावसकरांकडून म्हाडाला परत