मुंबई – एवढा वेळ मुंबईच्या महापौर कुठे होता, त्यांना या घटनेची जराही खबर नव्हती का, असा संतप्त सवाल आशीष शेलार यांनी मुंबईच्या महापौर याना विचारला आहे. वरळी परिसरातील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटात चार महिन्याच्या बाळासह अनेक लोक गंभीर रित्या जखमी झाले.
यानंतर जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. भाजलेल्या पुरुष आणि वर्षभराचं बाळ तासभर उपचाराविना तडफडत होतं. या बाळाचा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या संबंधित घटनेचा व्हिडियोही चांगलाच व्हायरल झाला होता. या घटनेनंतर भाजप नेते आशीष शेलार यांनी आज मुंबई महापौर किशोरी पेडणेकर आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचावर सडकून टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले आशिष शेलार