मुंबई – वरळी परिसरातील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटात चार महिन्याच्या बाळासह अनेक लोक गंभीर रित्या जखमी झाले. यानंतर जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. संबंधित घटनेचा व्हिडियोही चांगलाच व्हायरल झाला होता.
नायर रुग्णालयात मंगळवारी सकाळी गंभीररित्या भाजलेल्या पुरुष आणि वर्षभराचं बाळ तासभर उपचाराविना तडफडत होतं. या बाळाचा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरुन आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राणे यांनी फेसबुकवर व्हिडियो व फोटो पोस्ट आहे की,’माणुसकी जपा. कारण आपल्या’ कर्माचा’ हिशोब इथेच चुकवावा लागतो. ,’ छोट्याश्या चिमकुल्या बाळानं वेदनेने विव्हळत आपले प्राण सोडले.हीअत्यंत वेदनादायी घटना आहे.मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की,या कुटुंबाला दुखातून सावरण्याचं बळ मिळो. @AdityaThackeray माणुसकी जपा. कारण आपल्या’ कर्माचा’ हिशोब इथेच चुकवावा लागतो. असे म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले,’उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उधवस्त झाले तरी चालतील,पण पेग्वींन जगला पाहिजे, हेच आहे का MyBmc चं धोरण? ‘ असंही ते म्हणाले आहे.