मुंबई – अचानक वीज गायब झाल्याने मुंबईला आज मोठा फटका बसला. एकाचवेळी वेगवेगळ्या कंपन्यांच्या फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. अडिच तासाच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यास प्रशासनाला यश आले.
उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की, महापारेषणच्या 400 के.व्ही. कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट 1 ची दुरूस्ती सुरू होती. त्यामुळे सर्व भार सर्कीट 2 वर पडला. मात्र, सर्किट 2 मध्येही अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला.
आमचे विद्यूत कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत असून अर्धा- पाऊन तासात वीज पुरवठा पुन्हा सुरळीत होईल, असे राऊत यांनी सांगतले. त्यानंतर मुंबई मधील काही भागात 10 मिनिटांमध्ये वीज आली तर काही भागात वीज पुरवठा हळूहळू पूर्वपदावर आला.
अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. वीज
पुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही वेळाने सर्व मार्गावरील लोकल सेवा सुरू झाली.
अचानक वीज गेल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे, असे
उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.