मंबई – राज्यात करोना लाटेचा प्रभाव कमी होत जात आहे. त्यापार्श्वभूमीवर अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश शनिवारी मध्यरात्रीनंतर जारी करण्यात आले. नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई शहर तिसऱ्या गटात येत असल्याचे आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले की, राज्य शासनाच्या निकषानुसार आणि नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 95 टक्क्यांवर पोहोचलं असून, मुंबई यामध्ये तिसऱ्या गटात येत आहे. आज पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मुंबई शहरामध्ये करोना रुग्णसंख्या दुपटीचे प्रमाण 515 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला दोन आठवड्यांची आकडेवारी पाहता मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत आहे. ज्यामुळे मुंबई ही तिसऱ्या गटापर्यंत आहे असे महापौरांनी स्पष्ट केले आहे. येत्या काळात पहिल्या आठवड्यात मुंबई तिसऱ्या टप्प्यावर असली तरीही येत्या काळात मुंबई पॉझिटीव्हिटी रेटमध्ये दुसऱ्या टप्प्यात आल्यास त्यानुसार नियम लागू केले जातील. मुख्यमंत्री कार्यालय किंवा खुद्द मुख्यमंत्री काही वेळात याबाबतच्या सूचना जाहीर करतील असेही महापौर म्हणाला आहेत.
राज्य सरकारच्या निकषांनुसार सायंकाळी मुंबईतील व्यवहारांसाठीचे एक परिपत्रक काढण्यात येईल. तेव्हा मुंबई शहरातील अनलॉकचे चित्र अधिक स्पष्ट होईल अशी स्पष्टोक्ती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
हे ही वाचा
लग्नाळूंसाठी खुशखबर, ‘अशी’ असेल नियमावली
नव्या अनलॉक नियमांमध्ये ई-पास विषयी झाले ‘हे’ महत्वपूर्ण बदल; ‘या’ जिल्ह्यांना मोठा दिलासा