मुंबई : मागील दोन तीन महिन्यांपासून लॉक असणारा महाराष्ट्र अखेर सोमवारपासून अनलॉक होणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने मध्यरात्री याबाबतची अधिसूचना जारी केली.
या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे.
अनलॉक करत असताना पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. यावेळी लग्न करणाऱ्यांसह हॉल चालकांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. लग्न सोहळ्यासाठीचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
लग्न सोहळ्यासाठी परवानगी पुढील प्रमाणे
- नियमावलीनुसार पहिल्या स्तरात लग्न सोहळ्यास कोणतेही बंधनं नसणार आहेत.
-दुसऱ्या स्तरात लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल.
-तिसऱ्या स्तरात लग्न सोहळ्यास 50 जणांची उपस्थिती बंधनकारक असेल.
- चौथ्यामध्ये लग्न सोहळ्यास केवळ 25 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे.