भारताच्या कसोटी संघात मध्यमगती गोलंदाज मुकेश कुमारने पदार्पण केले आणि त्याने संपूर्ण देशातील खेळाडूंना एक महत्वाचा संदेश दिला की, तमुच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्हाला किर्तीमान मिळवण्यासाठी कोणतीही अडचण रस्ता रोखू शकत नाही. एका टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा ते कसोटी क्रिकेटपटू हा मुकेशने केलेला प्रवास थक्क करणारा आहे.
मुकेशला खरेतर सेनादलात जायचे होते. त्याचे वडीलच नव्हे तर संपूर्ण कुटुंबीयही त्याला त्याचसाठी प्रोत्साहन देत होते. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मुळचा बिहारचा जरी असला तरीही पश्चि बंगालकडून तो देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला व काही काळातच त्याचे नावही गाजू लागले.
2015 साली प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये हरियाणाविरुद्ध पदार्पण करताना त्याने आपली चुणूक दाखवली. पुढच्याच वर्षी त्याने गुजरातविरुद्ध देशांतर्गत टी-20 पदार्पणही केले. आतापर्यंत त्याने 33 देशांतर्गत स्पर्धांमध्ये मिळून 123 बळी मिळवले आहेत. त्याचे वडील काशिनाथ हे कोलकात्यात टॅक्सी चालवायचे, त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या मुकेशला क्रिकेटचे वेड लागले व पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आणी आज तो भारतीय कसोटी संघात खेळत आहे.
गोलंदाजीत दोन्ही कटर्स टाकणे हेच त्याच्या भात्यातील सर्वात मोठे वैशिष्ठ्य आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्याने आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले. आतापर्यत 10 सामन्यांतून 7 बळी घेतले आहेत. मात्र, त्याने देशांतर्गत स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळेच त्याला कसोटीत संधी मिळाली. आता त्याने प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत मिळालेल्या या संधीचे सोने केले तर देशाला एक प्रतिभावान गोलंदाज निश्चितच मिळेल असा विश्वास वाटतो.
पूर्वी भारतीय संघाकडे व्यंकटेश प्रसाद होता जो दोन्ही कटर्स अफलाचून टाकायचा मात्र, त्याच्यानंतर असा गोलंदाज पुन्हा मिळाला नाही. त्याला पक्का पर्याय म्हणून मुकेश कुमार गवसला आहे त्याला जपायला हवे.