जवळार्जुन -पुरंदर तालुक्यातील जवळार्जुनमधील विठ्ठलवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्यावर भराव्याची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. पांडेश्वर, नाझरे सुपे येथील पुलाची पाहणी करून काम पूर्ण करण्याचे आश्वासन सुळे यांनी शेतकऱ्यांना दिले.
माजी आमदार अशोक टेकवडे म्हणाले की, नादुरुस्त बंधाऱ्यांची आणि पुढची कामे जून आणि जुलैमध्ये पूर्ण करावेत. जुलैनंतर याठिकाणी पावसाचे प्रमाण जादा असते. त्यामुळे दीड महिन्यांमध्ये बंधाऱ्यांचे भराव बांधले गेले तर निश्चित बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. कोल्हापूर पद्धतीच्या 6 बंधाऱ्यांची दुरुस्ती, 3 पुलांची दुरुस्ती तात्काळ करावी, शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या आहेत. त्या अडचणी सोडविल्या जातील, असे सुळे यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुरंदरचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, सरपंच वर्षा संतोष टेकवडे, सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर टेकवडे, माजी सरपंच रामभाऊ राणे, आप्पासाहेब राणे, राष्ट्रवादी युवक नेते सचिन टेकवडे, शशिकांत टेकवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.