सातारा (प्रतिनिधी) – सातारकर सकाळी सकाळी झोपेत असतानाच करोनाने जोरदार धक्का दिला आहे. जिल्ह्यातील ५२ रुग्णांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३९४ झाली आहे. जिल्ह्यातील दोन करोनाबाधितांचा म्रुत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १२६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
वाई तालुक्यातील आसले येथील मुंबईवरून आलेला मधुमेह असलेला ६७ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचे निधन झाले आहे आणि जांभेकरवाडी (ता. पाटण) येथील ७० वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांंनी दिली.
बुधवारी सकाळी पाँझिटिव्ह आलेल्या रुग्णांची तालुका व गावनिहाय संख्या
- माण तालुका- म्हसवड-१, तोंडले-१, भालवडी-१ व लोधवडे-२
- सातारा तालुका- जिमनवाडी २, खडगाव-१, कुस बुद्रुक १
- वाई तालुका- आकोशी-१, आसले-१, मालतपूर १, देगाव-१ सिद्धनाथवाडी-१ व दह्याट-१
- पाटण तालुका -धामणी-४, गलमेवाडी १, मन्याचीवाडी १, मोरगिरी २, आडदेव १, नवारस्ता १,
- सदुवरपेवाडी २, जांभेकरवाडी १ (मृत्यू)
- खंडाळा तालुका- अंधोरी २, घाटदरे १ व पारगाव ७
- जावळी- सावरी ३, केळघर २
- महाबळेश्वर तालुका- कासरुड ३, देवळी ३, गोळेवाडी १त
- कराड तालुका- खराडे २, म्हासोली १, वानरवाडी १, उंब्रज १.
- फलटण तालुका सस्तेवाडी १
- खटाव- वांझोळी १, वरची अंभेरी १