Modi Goverment। देशात पुन्हा एकदा शेतकरी सध्या रस्त्यावर उतरला. आपल्या मागण्यासाठी बळीराजाने दिल्लीकडे कूच केलीय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर केलाय. सोबत पोलिसांवर दगडफेक होतीय. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर तणाव कमी होण्याऐवजी वाढला आहे. आता या सर्व वादात प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे. मोदी सरकारच्या कामावर शेतकरी नाखूश आहेत का?
इंडिया टुडे ग्रुपने मूड ऑफ द नेशन या नावाने सर्वेक्षण केलंय. ज्यामध्ये शेतकऱ्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आलेत.मोदी सरकारच्या १० वर्ष्याच्या कारकिर्दीत शेतकरी समाधानी झाला कि नाही ? असा सवाल करण्यात आला आहे. तसेच 2014 पासून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली की आणखी वाईट झाली हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
समसमान शेतकरी Modi Goverment।
सर्वेक्षणामध्ये ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे अशा ३३.४ टक्के शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्याच वेळी 32.5 टक्के शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे वाटते.
१० वर्षात खर्चात वाढ Modi Goverment।
आता असंतुष्टांची संख्याही जास्त आहे, अशा परिस्थितीत हा सर्व्हे निवडणुकीच्या काळात मोदी सरकारची चिंता वाढवू शकतो. मात्र, गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांच्या खर्चात लक्षणीय वाढ झाल्याचेही सर्वेक्षणातील आकडेवारीतुन समोर आले आहे. 62 टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना मोदी सरकार आल्यानंतर त्यांच्या खर्चात वाढ झाल्याचे वाटते. त्यामुळे सर्वसामान्य जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
मात्र, सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी किसान निधीसारख्या अनेक योजना राबवत आहे. या योजनांबाबत सर्व्हेत प्रश्न विचारला असता, ५६ टक्के शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ झाल्याचे मान्य केले. तर दुसरीकडे लाभ मिळाला नाही, असे मानणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे.
दरम्यान, देशातील शेतकरी सध्या आपल्या 12 मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. पंजाब आणि हरियाणामधील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा आंदोलन सुरु केलंय. एमएसपीच्या मुद्द्यावर शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चा आजपर्यंत निष्फळ ठरत आहे.