मुंबई -महावितरणचे उपसंचालक सुमित कुमार निलंबित राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह 300 आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा किंवा आश्वासन देत नाही तर ते पूर्णसुद्धा करते असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. “मुंबईचा विचार नेहमी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी’ असाच केला गेला असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा सभागृहात संबोधताना म्हणाले, अर्थसंकल्पाचा नव्हे तर देशाचा आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबईचे पुढे रुप कसं असणार आहे. जे मुंबई राहणारे कष्टकरी आहेत जे दुसऱ्याची घरं बांधतात परंतु त्यांची घरे नाही आहेत. मुंबईत अनेक जण येतात अन्न वस्त्र मिळतं. परंतु दिवसभर काम केल्यानंतर स्वतःच घरं नसते.’
पण सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून मनसेच्या आमदाराने ठाकरे सरकारला ‘कामाचा’ सल्ला दिला आहे. राजू पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
राजू पाटील यांचे ट्विट
आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे.त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा. @OfficeofUT @CMOMaharashtra
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 25, 2022