मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकताच एका मीडिया हाऊसला मुलाखत दिली. राज्यात अस्थिर झालेले सारा आणि बदललेले राजकारण याबाबत ठाकरेंनी याएवली भाष्य केले. यावेळी १९९५ साली असलेल्या महायुतीच्या सरकारचे उदाहरण देत बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना काय सूचना दिल्या होत्या याबाबत सांगितले. यावेळेसचा उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ ट्विट करत आता मनसेने काही सवाल उपस्थित केले आहेत.
“शिवसेना सत्तेत असताना विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही” असं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना सांगितलं होत असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मनसेने आता उद्धव ठाकरेंचा हाच व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटरवरून पब्लिश करत काही सवाल उपस्थित केले आहेत.
मनसेने आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे, “आपण मुख्यमंत्री असताना मशिदींवरील त्रासदायक भोंगे उतरावेत यासाठी सनदशीर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना त्रास का दिला गेला ? १७००० महाराष्ट्र सैनिकांवर गंभीर स्वरूपाचे खटले का भरले गेले? आंदोलक महाराष्ट्र सैनिकांवर कारवाई करताना ‘विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही’ हा स्व. बाळासाहेबांचा विचार तुम्ही विसरला होता का? ‘मशिदींवरील त्रासदायक भोंगे खाली यावेत’ ह्या स्व. बाळासाहेबांच्या इच्छापूर्तीसाठी आंदोलन करणं हा महाराष्ट्र सैनिकांचा गुन्हा होता का? असे सवाल यावेळी मनसेने उपस्थित केले आहेत.
मनसेने यावेळी उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. उद्धव ठाकरेँव्यतिरिक्त मनसेने आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील यादम्यान जाब विचारला आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सांगतात कि, “आमचं सरकार स्व. बाळासाहेबांच्या विचारांचे आहे.” मग भोंगे आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक मुला-मुलींवर माविआ सरकारने भरलेले खटले आपण केव्हा मागे घेणार ? असा थेट सवाल यावेळी मनसेने विचारला आहे.
“शिवसेना सत्तेत असताना विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही.” असं हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी १९९५ साली तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री कै. गोपीनाथ मुंडे ह्यांना सांगितल्याचा प्रसंग मा. उद्धवजींनी एका मुलाखतीत सांगितला.
मग… pic.twitter.com/MG3OzYY6KX
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 13, 2023
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक संघर्ष करत आपली वाटचाल करत आहे. पण एखाद्या प्रश्नावर आंदोलन करताना जेव्हा सरकारी बळाचा वापर करून, गंभीर स्वरूपाचे खटले भरून राजकीय कार्यकर्त्यांना आयुष्यातून उठविण्याचे जे प्रकार होतात ते बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक म्हणवणाऱ्यांकडून होऊ शकत नाहीत ! आता ते का झाले, ह्याचं उत्तर उमगण्यास आपण सुज्ञ आहेत. असं देखील मनसेने आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे.