मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी (दि. 3) हल्ला करण्यात होता. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगण्यात आलं. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. आणि संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली असून, या हल्ल्यात देशपांडे त्यांच्या पायाला आणि हाताला मार लागला आहे. पायावर जास्त मार लागला आहे. मात्र, डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र कुठेही मार लागला नाही.
दरम्यान, हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मनसे आक्रमक पाऊल उचल्याचं दिसून आलं आहे. या हल्ला प्रकरणी ठाण्यातील चिराग नगर येथून दोन जणांना मुंबई पोलिसांनी चौकशी करिता ताब्यात घेतले.
ही माहिती कळताच ठाण्यातील शेकडो मनसेचे सैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट ताब्यात घेतलेल्या संशयित्यांच्या घरांवर हल्लाच चढवला. यावेळी मोठा राडा पाहायला मिळाला होता. मात्र, काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मनसे कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्थिती नियंत्रणात आली.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी काल दोघांना अटक केली. अशोक खरात आणि किशन सोळंकी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. त्यातील अशोक खरात नावाचा आरोपी हा माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचं समोर आले आहे.