Mla Ganpat Gaikwad : तुम्ही जर विनायक राऊत आणि वैभवला निवडून दिल नसत तर इथं देखील गॅंगवॉर झालं असत असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये आता गॅंगवॉर सुरु झालं आहे असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले. मालवणमध्ये बोलताना ठाकरेंनी आमदार गणपत गायकवाड यांच्या फायरिंग प्रकरणावरून शिंदे फडणवीसांवर जोरदार टीका केली.
सत्ताधारी पक्षात आता गॅंगवॉर सुरु झालं आहे. मिंधे आणि फडणवीस गॅंग.. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होताहेत. पोलीस आणि कायदाच जर हतबल झाला असेल तर असे गणपत गायकवाड उभे राहले तर दोष कोणी कोणाला द्यायचा असा सवाल देखील ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. तिकडे काय घडलं याच सीसीटीव्ही फुटेज देखील बाहेर आले असल्याचा सूतोवाच ठाकरेंनी केला.
शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत महाराष्ट्रात गुंडागर्दी होत राहील.. गुंडांची पैदास होईल हे भाजपाच्या आमदाराच वक्तव्य आहे असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना अटक झाली आता केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. मग गणपत गायकवाड यांनी जे स्टेटमेंट केलं आहे त्यांचे करोडो रुपये मिंध्यानकडे आहेत त्याची चौकशी होणार आहे की नाही.. की चौकशी न करता त्यांना मोदी गॅरेंटी आहे म्हणत क्लीन चिट देणार हे आता समजेल असं देखील ठाकरे म्हणाले.
गणपत गायकवाड फायरिंग प्रकरण काय ?
कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे हिललाईन पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले.यावरूनच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.