मुंबई – ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर होत असून राजभवनात ३६ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार ‘बच्चू कडू’ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.