नवी दिल्ली – टोकियो ऑलिंपिक २०२०च्या स्पर्धेत भारताला वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदक मिळवून देणारी महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूची 2021-22 च्या कालावधीतील बीबीसीतर्फे सर्वोत्तम भारतीय महिला क्रीडापटू म्हणून निवड करण्यात आलेली आहे. देशभरून तिचे कौतुक होत आहे.
गेल्यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदक मिळवून मिराबाई चानूने नवा इतिहास घडविला. वेटलिफ्टींग प्रकारात ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवून देणारी मिराबाई ही भारताची पहिली महिला वेटलिफ्टर आहे. बीबीसीतर्फे भारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीची फलंदाज शफाली वर्माची सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भारताची माजी वेटलिफ्टर करनम मलेश्वरीचा बीबीसीतर्फे आजीवन पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.