नवी दिल्ली – अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रीया चालू आहे. बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीताराम बुधवारी कृषी आणि अन्न पक्रिया क्षेत्रातील तज्ञाबरोबर चर्चा करणार आहेत. लॉक डाऊनमुळे ग्राहकाकडून खरेदी कमी झाली आहे. ती वाढावी याकरिता काय करावे लागेल या संदर्भात सिताराम विविध घटकांशी चर्चा करीत आहेत. रिझर्व बॅंकेने यावर्षी विकासदर 9.5 टक्के राहील असे म्हटले आहे. मात्र अजूनही तो करोनापूर्व पातळीवर आला नसल्याचे बऱ्याच तज्ञांना वाटते.
अर्थसंकल्पामध्ये यावर्षी तूट 6.8 टक्के राहील असे सांगितले आहे. सरकारचा एकूण खर्च आणि महसूल पाहता ही तूट आटोक्यात राहील असे चित्र निर्माण झाले आहे. 1 फेब्र्रुुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता आहे. या वर्षी पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीतील विकास दर समाधानकारक आहे. शेवटच्या दोन तिमाहीतही विकास दर याच पातळीवर ठेवण्याचा अर्थ मंत्रालयाचा प्रयत्न आहे. यासाठी रिझर्व बॅंकेला भांडवल सुलभता कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते.