मुंबई – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 153 (A) या कलमाखाली राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली असून आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेत झाली. यामध्ये किरीट सोमय्यांना किरकोळ जखम देखील झाली. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दांनी पोलिसांना फक्त २४ तास सुटीवर पाठवावं. मग हे सगळे हल्ले थांबतील याची आम्ही काळजी घेऊ” असं ट्विट करत त्यांना जाहीर आव्हानच दिलं आहे.
नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की,“जर महाराष्ट्रात पोलीस विभागाच्या संरक्षणात दररोज भाजपाच्या नेत्यांवर उद्धव ठाकरेंच्या गुंडांकडून हल्ले होणार असतील, तर त्याला शौर्य म्हणत नाहीत. मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दांनी पोलिसांना फक्त २४ तास सुटीवर पाठवावं. मग हे सगळे हल्ले थांबतील याची आम्ही काळजी घेऊ”
काय आहे नितेश राणे यांचे ट्विट
”जर दररोज भाजपच्या नेत्यांवर ठाकरे गुंडांनी पोलिस संरक्षणात हल्ला केला तर.. याला शौर्य म्हणत नाही…
मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दांनी पोलिसांना फक्त २४ तास सुटीवर पाठवावं. मग हे सगळे हल्ले थांबतील याची आम्ही काळजी घेऊ” …
#राज्यपुरस्कृत भ्याड..!
If everyday @BJP4Maharashtra leaders r going 2 b attacked under police protection by thackray goons..
That’s not called bravery..
The So called “Mard” sittin in Matoshree shud ask the police 2 go on leave just for 24 hrs..
V shall ensure all this stops!
State sponsored cowards!— nitesh rane (@NiteshNRane) April 24, 2022