श्रीनगर – काश्मीरात 1931 मध्ये या दिवशी डोगरा शासकाच्या सैन्याने ठार केलेल्या 22 काश्मिरी लोकांना श्रद्धांजली वाहण्यापासून रोखण्यासाठी सरकारने आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा आरोप पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या की, त्यांनी कितीही दडपशाहीं केली तरी आम्ही भाजपला आमचा इतिहास विकृत करू देणार नाही किंवा आमच्या नायकांना विसरु देणार नाही.
आज शहीदांच्या स्मशानभूमीला भेट द्यायची इच्छा व्यक्त केल्याने मला नजरकैदेत ठेवले गेले आहे.
कलम 370 रद्द केल्याने काश्मीरात स्थिती सामान्य झाल्याचा दावा भारत सरकारने कितीही केला तरी तो निरर्थक आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मेहबूबा यांनी त्यांच्या निवासस्थानाचे मुख्य गेट दर्शविणारे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात त्यांचे घर बाहेरून बंद करण्यात आल्याचे दिसत आहे.
भाजपचे वीर सावरकर, श्यामा प्रसाद मुखर्जी गोवळकर आणि गोडसे ज्यांची विचारसरणी द्वेष आणि फूट पसरवते त्यांना आम्ही आम्ही आमच्यावर लादू देणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही रुजवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या धाडसाचे नेहमीच कौतुक केले जाईल. आम्ही तुम्हाला आमचा इतिहास विकृत करू देणार नाही किंवा आमच्या वीरांना विसरु देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.