मुंबई- भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यातून बरे होणाऱ्याची संख्या प्रचंड आहे. भारताचा रिकवरी रेटसुद्धा चांगला आहे. मात्र सगळं जग एकाच प्रश्नात पडला आहे तो म्हणजे लस कधी येणार? अमेरिकेतील आॅक्सफर्डच्या लसीचे प्रयोग सुरु आहेत. औषधाने रुग्ण बरा होत असताना लशीची गरज काय? जाणुन घ्या लस आणि औषध यामधील फरक…
लस-
लस हा कोणत्याही आजारापासून बचावाचा मार्ग आहे. लसीच्या मदतीने सुरूवातीपासूनच इम्यूनिटी विकसीत केली जाते. भविष्यात आजार उद्भवू नये यासाठी लस दिली जाते. लसीमुळे दीर्घकाळापर्यंत व्यक्तीचे शरीर व्हायरसपासून स्वतःचा बचाव करू शकते. साधारणपणे लस शरीरात डायरेक्ट इंजेक्ट केली जाते.
औषधं-
आजाराच्या उपचारांसाठी औषधं वेगवेगळया माध्यामातून दिली जातात. द्रव स्वरूपात, कधी इंजेक्शन तर कधी पावडर आणि गोळ्याच्या माध्यमातून रुग्णाला दिली जातात. पण एकदा औषधं घेतल्यानंतर पुन्हा रुग्णाला इन्फेक्शन किंवा त्रास होण्याची शक्यता असते. औषधांचा परिणाम दीर्घकाळपर्यंत दिसून येत नाही. तात्पुरत्या स्वरुपाचा असतो.