औरंगाबाद – गंगापूर येथे आयोजित 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. जगदीश कदम हे गेल्या पाच शतकांपासून लेखन करीत असून कथा, कविता,कादंबरी, नाटक,
चरित्र, व्यक्तिचित्र, समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी रास आणि गोंडर, झाडमाती, नामदेव शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर,ऐसी कळवळ्याची जाती हे कवितासंग्रह लिहले आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. डॉ. जगदीश कदम यांनी मुडदे, आखर, मुक्कामाला फुटले पाय हे कथासंग्रह लिहले.
गाडा, ओले मूळ भेदी कांदबऱ्या लिहल्या आहेत. बुडत्याचे पाय खोलात,वडगाव लाईव्ह ही नाटके लिहले आहेत. आकलन आणि आस्वाद हा समीक्षेचा ग्रंथ लिहला. म.ज्योतिबा फुले, म. गौतम बुद्ध ही चरित्र पुस्तके लिहले. गांधी समजून घेताना हे वैचारिक पुस्तक लिहिले असून कन्नड आणि हिंदी भाषेमध्ये त्यांच्या नाटकांचा अनुवाद झाला आहे.