नांदेड – मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचं राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या मुद्दावर राज्यभर मोर्चे काढण्याचा इशारा दिला आहे. तर भाजपही मराठा आरक्षणावरून आक्रमक झालं आहे. यावर काँग्रेसनेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी संभाजीराजेंना आरक्षणाच्या मुद्दावर सल्ला दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार, असा सवाल करत त्यापेक्षा ज्या-ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत तिथे त्यांनी आवाज उठवला तर फायदा होईल अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
याआधीच खासदार संभाजी राजे यांनी १६ जून रोजी कोल्हापूरमध्ये मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यावरून अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच सरकार मराठा आरक्षणाच्या बाजुने आहे. मग हा मोर्चा कोणाच्या विरोधात काढणार, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींनी भूमिका घेतली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असंही मोदी यांनी म्हटलं.