नवी दिल्ली – भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत हॉकीत ऑलिंपिकचे तिकीट मिळविणारच, असा विश्वास भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार मनदीपसिंग याने व्यक्त केला आहे.
तो म्हणाला की, ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहात असतो. टोकियो येथे पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी आम्हाला पात्रता स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. त्यासाठी आम्ही खूप मेहनत करीत आहोत. आमच्या संघात युवा व अनुभवी खेळाडूंचा चांगला समतोल आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही हॉकीत ऑलिंपिकचे तिकीट मिळविणारच अशी मला खात्री आहे.