Loksabha 2024 : भारतीय जनता पक्षाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत शंभर जागा मिळणेही कठीण होऊन बसले असून त्यांची अबकी बार चारसौ पार ही घोषणा फोल ठरणार आहे, उलट यावेळी अब की बार सत्तासे बाहर अशा स्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
भारत जोडो न्याय यात्रेत ते आज अमेठी येथे एका सभेत बोलत होते. ते म्हणाले की अमेठी आणि रायबरेलीच्या विकासाकडे भाजपने पुर्ण दुर्लक्ष केले आहे. केंद्र सरकारने अमेठी आणि रायबरेली या दोन मतदार संघांवर अन्याय करताना येथील जनतेवरही सूड उगावला आहे. | Mallikarjun Khargen criticizes BJP
येथील लोकांच्या मनात द्वेष पसरवण्याचे कामही त्यांनी केले आहे असा आरोपही खर्गे यांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात अमेठीत कोट्यवधींचे प्रकल्प मंजूर करण्यात आले होते, परंतु त्यापैकी बहुतांश प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत. मला त्यांना विचारायचे आहे की ते प्रकल्प अद्याप अपूर्ण का आहेत.त्यांना अमेठी आणि रायबरेलीसाठी काम करायचे नाही.असा आरोपही खरगेंनी यावेळी लगावला. | Mallikarjun Khargen criticizes BJP
मोदी इथे येऊन काँग्रेस पक्षावर प्रकल्प रखडवल्याचा आरोप करतील. पण तुम्ही आता काय करत आहात ते मला सांगा असे आवाहन त्यांनी मोदींना केले. जनता याला चोख प्रत्युत्तर देईल असे ते म्हणाले. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या प्रमुखांबरोबर चर्चा सुरू असून सर्वकाही सुरळीत होईल अशी ग्वाहीही ख्रगेंनी यावेळी दिली.