उंब्रज : राज्यासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा भाविकांच्या साक्षीने भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.
फुलांनी सजवलेल्या अब्दागिरीने खंडेराया आणि म्हाळसा यांची रथातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी तारळी नदीच्या तीरावर भाविकांनी गर्दी केली होती. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले. यावेळी भाविकांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान जिल्हा प्रसाशनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडला विवाह सोहळा सुरळीत पार पडला .