नवी दिल्ली – महाराष्ट्र सदन घोटाळ्यात राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत या प्रकरणी चार वेगवेगळ्या याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार आहे. यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोच्च न्यायालयात अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल केलेली याचिका निकाली आहे. अशातच अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांना निर्दोष करार देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीशांनी आपल्यासमोर हे प्रकरण नको, केल्यामुळे सुनावणी होत नव्हती. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत नाही म्हणून अंजली दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यानुसार आता हे प्रकरण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोडक यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायाधीश मोडक यांनी संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर चार वेगवेगळ्या याचिकांवर स्वतंत्र होणार सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल आणि 29 एप्रिल ला स्वतंत्र होणार आहे.
नेमके प्रकरण काय?
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विविध कंत्राटाच्या माध्यमातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांच्या नावावर रोख रक्कमेच्या स्वरूपात लाच मिळाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावेळी अंजली दमानिया या आम आदमी पक्षांमध्ये काम करत होत्या. त्यात महाराष्ट्र सदन आणि इंडियाबुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर ईडीच्या वतीने देखील दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.