मुंबई :- राज्यातील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार असून, आता या निवडणुका कधी लागतात. याकडे मात्र, सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर 1 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती.
मात्र, कामकाजाच्या वेळापत्रकात या याचिकेचा समावेश नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्याव्या या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 2022च्या ऑगस्ट महिन्यांत सुनावणी झाली होती. त्यानंतर या याचिकेला तारीख पे तारीख मिळत आहे.